Posts

Showing posts from October, 2020

अध्याय १ ला - अभंग .अर्जुन विषाद ३३३ ते ३८९************

Image
अध्याय १ ला - अभंग  .अर्जुन विषाद  ३३३ ते ३८९ ************ निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥३१॥ कौरवांचा वध । जरी वाटे चांग । न मारुं कां सांग । धर्मादिकां ॥३३३॥ आम्ही आप्तजन । सर्व हि निभ्रांत । एक चि ना गोत । एकमेकां ॥३३४॥ म्हणोनियां देवा । जळो जळो झुंज । माने ना हें मज । कांहीं केल्या ॥३३५॥ महा -पातकाचा । कां गा व्हावें धनी । दिसे मज हानि । सर्वस्वाची ॥३३६॥ ऐसें वाट आतां । टाळिली लढाई । तरी आशा कांहीं । कल्याणावी ॥३३७॥ न काङेक्ष विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च । किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥३२॥ येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यत्वा धनानि च ॥३३॥ आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः । मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्वन्धिनस्तथा ॥३४॥ देखोनि हें मज । नको नको जय । राज्य तरी काय । कशासाठीं ॥३३८॥ वधोनि हे सर्व । भोगावे जे भोग । लागो तयां आग । पार्थ बोले ॥३३९॥ ऐशा भोगाभावीं । कैसी हि आपदा । येवो तो गोविंदा । साहवेल ॥३४०॥ पुढें उभे कोण । गुरु भीष्म -द्रोण । सुखें वेचू

अध्याय १ ला - अभंग .२७७ ते ३३२ अर्जुन विषाद

Image
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते । अर्जुन उवाच सेनयोरुयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥२१॥ यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ‍ । कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् ‍ रणसमुद्यमे ॥२२॥ योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः । धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥२३॥ म्हणे सर्वातून । कोणाशीं झुंजावे । लागे हें पहावें । म्हणोनियां ॥२७७॥ दोन्ही सैन्यामाजीं । नेवोनि त्वरित । देवा माझा रथ । उभा करीं ॥२७८॥ जोंवरी हे सर्व । वीर धीट धीट । क्षणभरी नीट । न्याहाळीन ॥२७९॥ बहु उतावीळ । दुष्ट हे कौरव । झुंजायाची हांव । बाळगिती ॥२८०॥ नाहीं रणीं धैर्य । नाहीं पराक्रम । आवडे संग्राम । परी ह्यांतें ॥२८१॥ रायालागीं ऐसा । सांगोनि वृत्तांत । संजय तो तेथ । काय बोले ॥२८२॥ संजय उवाच --- एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ‍ ॥२४॥ भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ‍ । उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरुनिति ॥२५॥ तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पिता महान । आचार्यान्मातुलान्भातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥२६॥ श्वशुरन्सुहृदश्वैव सेनयोरुभयोरपि । तान

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग .२०३ ते २७६ दुर्योधन बोलणे.भीष्म आणि पांडव शंख ध्वनी.युद्धभुमी वर्णन ****************

Image
दुर्योधन बोलणे.भीष्म आणि पांडव शंख ध्वनी.युद्धभुमी वर्णन  **************** अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः । भीष्ममेवाभिरक्षान्तु भवन्तः सर्व एव हि ॥११॥ सर्व सेनापती । आपुले पाहोन । पुन्हां दुर्योधन । काय बोले ॥२०३॥ म्हणे झुंजावया । सिद्ध व्हा सकळ । आपुलालें दळ । सज्ज करा ॥२०४॥ ज्यांच्यापाशीं ज्या ज्या । होती अक्षौहिणी । त्या त्या येथें रणीं । विभागाव्या ॥२०५॥ वरी अधिकारी । जो जो महारथी । तेणें तयांप्रति । आवरोनि ॥२०६॥ रहावें सर्वानी । भीष्माच्या आज्ञेंत । जाणोनि तो श्रेष्ठ । सर्वामाजीं ॥२०७॥ मग पुन्हां ऐसें । बोले द्रोणापासीं । संरक्षावें ह्यासी । तुम्ही आतां ॥२०८॥ सर्वभावें ह्यातें । माझ्या ठायीं माना । सैन्या साचपणा । ह्याच्या योगें ॥२०९॥ तस्य संजनयन्हर्ष कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शडंख दध्मौ प्रतापवान ॥१२॥ ऐकोनि हे बोल। भीष्म संतोषला । मग तेणें केला । सिंहनाद ॥२१०॥ दोन्हीं दळांमाजीं । नाद तो अद्‌भुत । मावे ना नभांत । प्रतिध्वनि ॥२११॥ त्या चि प्रतिध्वनि - । सवें वीरश्रीनें । वाजविला तेणें । दिव्य शंख ॥२१२॥ मिळतां ते दोन्ही । नाद तिये काळीं । बधिरता आली ।