ॐ स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी ‘अध्याय १ ला - अभंग १५१ ते२०२ दुर्योधनाचे बोलणे व सैन्य वर्णन .
ॐ नमो भगवते वासुदेवाय । धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्वैव किमकुर्वत संजय ॥१॥ पुसे धृतराष्ट्र । संजयालागोनि । मोहित होवोनि । पुत्र -प्रेमें ॥१५१॥ म्हणे सांगें मज । जें का धर्मालय । तेथें झालें काय । कुरु -क्षेत्रीं ॥१५२॥ जेथें ते पांडव । आणि माझे पुत्र । मिळाले एकत्र । युद्धालागीं ॥१५३॥ एवढया वेळांत । परस्परें त्यांनीं । काय केलें झणीं । सांगें मज ॥१५४॥ संजय उवाच दृष्टाव तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ॥२॥ तिये वेळीं काय । संजय तो बोले । सैन्य उफाळलें । पांडवांचें ॥१५५॥ कल्पांताच्या वेळीं । कृतांताचें मुख । पसरावें देख । जैशा रीती ॥१५६॥ तैसें तें घनदाट । उठे एकवाट । जणूं काळकूट । उसळलें ॥१५७॥ किंवा वडवाग्नि । पेटे अकस्मात । भेटे महा -वात । तों चि त्यासी ॥१५८॥ मग त्याच्या ज्वाला । शोषोनि सागरा । झोंबाव्या अंबरा । जैशा रीती ॥१५९॥ तैसा दळ -भार । पाहतां दुर्धर । भासला भेसूर । तिये काळीं ॥१६०॥ ठाकतां सामोरा । हत्तींचा मेळावा । जैसा उपेक्षावा । सिंहराजें ॥१६१॥ तैसा नाना व्यूहीं । कोशल्यें रचिला ।